All posts by pratap bodkhe

pm kisan samman nidhi yojna | PM किसान योजनेत मोठा बदल -लगेच करावे लागणार हे काम

आता pm kisan samman nidhi yojna आलेली असून शेतकऱ्यासाठी आताची हि मोठी बातमी आहे.तुम्हाला तर माहीतच आहे कि केंद्र सरकारच्या माध्यमातून pm kisan yojna राबविली जात होती. या योजनेचा माध्यमातून शेतकऱ्याना वर्षाकाठी ६००० हजार रुपये मिळत होते आता मात्र या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.नेमका काय बदल झाला आता कोणते शेतकरी पात्र राहणार? कोणते शेतकरी अपात्र होणार?

pm kisan samman nidhi yojna

cm kisan yojna 2023 म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या बाबत देखील मोठा निर्णय घेण्यात आला असून आता खर्च शेतकऱ्याना ६ हजार ऐवजी १२००० मिळणार का या संदर्भातील महत्वाचा शासन निर्णय ( GR ) आलेला आहे .हीच संपूर्ण माहिती आजच्या लेखात तुम्हाला देणार आहोत तेव्हा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा ..

शेतकरी मित्रानो आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्यात मान्यता देण्यात अली असून या संदर्भातील अतिशय महत्वाचा शासन निर्णय १५ जून २०२३ रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडून जारी करण्यात आला आहे.या मध्ये बरेच निर्णय घेण्यात आलेले असून आता आपण सविस्तर पाहूया.

पीएम किसान योजनेचं स्वरूप व अडचणी | PM KISAN YOJNA

केंद शासनाने शेतकरी कुटुंबाना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM kisan yojan) सुरू केली होती.हे तर तुम्हाला माहीतच आहे,आणि त्यानुसार फक्त शेतकरी कुटुंबास म्हणजे पती-पत्नी व 18 वर्षा खालील त्यांचा मुलं यांचा त्यात समावेश होता.

pm kisan yojna update :- या शेतकरी कुटुंबाला प्रति वर्ष ६ हजार रुपये लाभ दिला जात होता.यामध्ये दर चार मकहन्यांनी रु. 2000/- अशी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होती होती. आणि आतापर्यन्त हि योजना सुरळीत चालू देखील आहे. मात्र मधेच काही शेतकर्याचे हे पैसे मिळणे बंद झाले त्यामुळे बरेच शेतकरी गोंधळले होते.मग सरकारच्या माध्यमातूम बोगस शेतकऱ्याना हटविण्यासाठी पाम किसान खात्याची ekyc केली गेली आणि जे शेतकरी नव्हते ते अपात्र ठरविण्यात आले.

तुम्हाला २ हजाराचा हप्ता मिळत नाही मग -मोबईल वर करा ekyc फक्त 5 मिनिटात

आता पात्र शेतकऱ्यासाठी हि योजना सुरळीत चालू आहे .हि योजना चांगल्या प्रकारे चालविली जात असल्याने pm kisan samman nidhi yojna ची नोंद देश पातळीवर घेण्यात आली. मात्र 2021 पासून सदर योजनेच्या कामकाजात अडथळे येऊ लागले नंतर पी.एम.किसान योजना कृषी विभागाकडे द्या अशी मागणी होऊ लागली.मात्र असं न होता विविध विभागांनी या योजनेचं काम सांभाळायला सुरुवात केली

.आणि यातूनच हि योजनेच्याअडचणी आणखीच वाढल्या .सादर पी.एम.किसान योजना राबविण्यात येणा-या अडचणी विचारात घेवून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी 30 मे २०२३ रोजीच्या मंत्रीमंडलाच्या बैठिीत मान्यता देण्यात आली .

पीएम किसान योजने बाबत मह्त्वाचा शासन निर्णय |pm kisan samman nidhi yojna

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 15 फे ब्रुवारी 2019 च्या शासन निर्णया नुसार
राज्यात येण्यासाठी तसेच सदर योजना राबविताना बऱ्याचशा येणा-या अडचणी विचारात घेऊन या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्याला मिळावा हा मुख्य हेतू आहे.

कुणीही पात्र लाभार्थी या योजने अंतर्गत वंचित राहू नाही या करिता प्रत्येक विभाग निहाय कामे वाटून देण्यात आलेली आहेत.आता प्रत्येक विभागासाठी कार्यपद्धती सोपविण्यात आलेली आहे.आणि ह्या जबाबदाऱ्या त्या त्या विभागाला चोख पार पाडाव्या लागणार आहेत.अन्यथा त्यांच्यावर कठोर कार्यवाही होईल असे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत.

कोणत्या विभागाला काय कार्य पार पडावे लागणार | विभाग निहाय जबाबदाऱ्या व कर्तव्य

शेतकऱ्यांच्या जबाबदाऱ्या

प्रत्येक विभागाला काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत मात्र शेतकऱ्याना देखील काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत.शेतकऱ्यांच्या जबाबदाऱ्या खालील प्रमाणे आहेत.
१) pm किसान योजनेसाठी अर्ज करणे
२) pm kisan ekyc करणे.
३) बँक खाते आधार सोबत जोडणी करणे.
४) आधार कार्ड नियमित अपडेट करणे.
५) शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे .

कृषी विभागाच्या जबाबदाऱ्या काय?

कृषी विभागाला खूप जास्त जबाबदाऱ्या दिल्या असून शेतकऱ्याना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आलेलं आहे.कृषी विभागाचे काही काम व जबाबदाऱ्या खालील प्रमाणे आहेत.


१) स्वता अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना मान्यता देणे.
२) तालुका स्तरावर पोर्टलवर लाभार्थ्याची नोंदणी करणे .
३) अपात्र लाभार्थ्याला पडताळणी करून बॅड करणे.
४) वेळोवेळी डेटा दुरुस्त झाल्यास नोंद ठेवणे
५) शेतकऱ्यांची भौतिक तपासणी करणे.
६) चुकीने अपात्र झालेल्या शेतकऱ्याना पात्र करणे.
७) लाभार्थी मयत झाल्यास त्याची नोंद करून बाहेर काढणे.
८) शेतकऱयांच्या तक्रारी सोडविणे व त्यांना मदत करणे .
९) योजना अधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रचार व प्रसार करणे.

महसूल विभागाच्या जबाबदाऱ्याव कार्य


कृषी विभागा प्रमाणे महसूल विभागाल देखील बऱ्याच जबाबदाऱ्या दिल्या आहेत.शेतकऱ्याना वेळोवेळी आलेल्या काही अडचणी महसूल विभागाला सोडवाव्या लागणार आहेत.या विभागाचे काही काम व जबाबदाऱ्या खालील प्रमाणे आहेत.
१) भूमी अभिलेख नोंदणी योग्य आहे पाहणे.
२) लँड शेडींग अपडेट करून पात्र शेतकऱ्याना प्रमाणित करणे.
३) ७/१२ व ८ बाबत काही अडचण आल्यास त्या सोडविणे.
४) अपात्र लाभार्थ्याने योजनेच्या माध्यमातून मिळविलेल्या रकमा परत घेणे.
५) अपात्र लाभार्थ्याकडून मिळालेल्या माहिती पोर्टल ला देणे.

pm किसान योजनेत काय बदल झालेत नवीन कार्य पद्धती काय

खरं तर ११ कोटीहून अधिक शेतकऱ्याचे या योजनेसाठी अर्ज केले होते सुरुवातीला शेतकर्याना सुरळीत हप्ते देखील मिळत होते मात्र जस जसे एक एक वर्ष निघून जात होते तास तसे या योजनेच्या अडचणी वाढत जाऊन मोठ्या प्रमाणावर शेतकरी नाराज होऊ लागले कारण त्यांना मिळणारा हप्ता बंद झाला होता.त्यानंतर सरकारच्या माध्यमातून ekyc करायला लावली ,बँक खात्याला आधार जोडायला सांगिले,लँड शेडींग करायला सांगितले.

एव्हढाच काय तर आधार कार्ड अपडेट करायला सांगितले.ह्या साऱ्या गोष्टी करून देखील लाखो शेतकऱ्याचे हप्ते पेंडिंग राहिले.अजूनही ते शेतकरी या कार्यालयातून त्या कार्यालयात पायपीट करत आहेत.या सर्व अडचणीच्या अनुशंगाने आता मात्र नवीन कार्यपद्धती लागू करण्यात अली आहे.
या कार्यपद्धतीचे खालील काही म्हणत्वाचे मुद्दे आहेत.

१) अर्जदाराने केंद्र सरकारच्या पोर्टलवर स्वता नोंदणी करावी किंवा तालुका कृषी अधिकार्याच्या मदतीने सल्ल्याने कंसच मार्फत आवश्यक कागद \पत्रासह नोंदणी करावी.

२) अर्जदाराणे नोंदणी केल्यानंतर तो अर्जदार खर्च शेतकरी आहे का यांची पूर्ण पडताळणी करण्यासाठी तहसीलदाराला पोर्टल उपलब्ध करून देणे

३) तहसीलदाराने संबंधित अर्जदार शेतकऱ्याचे कागदपत्र पडताळणी करून शेतकऱ्याना पात्र असेच अपात्र ठरवतील.

४) तहसीलदाराने पात्र ठरविल्या नंतर आता महसूल विभाग पुन्हा त्याचे फेर पडताळणी करून पुढील कार्यवाहीसाठी कृषी विभागाला माहिती सादर करतील.

५) तालुका व जिल्हा कृषी अधिकारी यानंतर लाभार्थी इतर नियमात बसतात का हे पडताळणी करतील.

६) तहसील दाराची सर्व प्रक्रिया झाल्या नंतर तालिका व जिल्हा कृषी अधिकारी हा शेतकरी पात्र आहे कि अपात्र आहे हे ठरवतील.अपात्र ठरविल्यास पोर्टल वर त्याचे कारण स्पस्ट करतील.

७)आता तालुका व जिल्हा स्तरावरून संपूर्ण प्रक्रिया पार पडल्या नंतर राज्यस्थरावरून त्याची शेवटची मान्यता देण्यात येईल.

राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीची जबाबदारी


pm किसान योजनेसाठी शेतकऱ्यानी अर्ज केल्यापासून तर तालुका स्तरावरील संपूर्ण प्रक्रिया पार पडल्या नंतर आता काम सुरु होते ते राज्यस्तरीय समितीच.या समितीला काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत ज्या खालील प्रमाणे आहेत.

१) पाम किसान योजनेशी संबंधित सर्व विभागावर देखरेख ठेवणे व त्यांच्या काही अडचणी असल्यास त्या दूर करणे.

२) योजना सुरळीत चालू आहे कि नाही यावर लक्ष्य ठेवणे.

३) राज्य व केंद्र सरकार यांच्यात समन्वय प्रथापित करणे व वेळोवेळी योजनेचा पाठपुरावा करणे.

४) योजनेत काही अडचणी आल्यास त्या दूर करणे व त्याच्या बदला बाबत निर्णय घेणे.

५) प्रत्येक सहा महिन्यात हि योजना सुरळीत चालू आहे? का त्यात काही अडचणी आहेत का?या साठी आढावा बैठक घेणे.

राज्यस्तरावरील अंमलबजावणी प्रमुख


राज्यस्तरीय समितीची रचना करत असताना त्यात मुख्य अंमलबजावणी प्रमुखांची निवड करण्यात अली आहे.या समितीतील सर्व सदस्यांना विस्वासात घेऊन या अंमलबजावणी प्रमुखाला कार्य करावे लागते.या प्रमुखाला देखील जबाबदाऱ्या व कार्य देण्यात आले आहेत.

१) पाम किसान योजनेशी संबंधित अर्जाची पडताळणी करून त्यांना पात्र व अपात्र करणे.

२) योजना सुरळीत चालू ठेवण्यासाठी आलेल्या शंका व तक्रारींचे निवारण करणे.

3) प्रत्येक तीन महिन्यात हि योजना सुरळीत चालू आहे? का त्यात काही अडचणी आहेत का?या साठी आढावा बैठक घेणे व त्याची आमल बजावणी करणे.

ग्रामस्तरीय समितीचे कार्य व जबाबदारी :-


या समितीच खूप महत्वाचं काम असून इतर समित्या प्रमाणे हि समिती आपले कार्य पार पडत असते.या समितीच्या नावावरूनच लक्षात येते कि हि गाव पातळीवर काम करणारी समिती आहे.या समितीमध्ये गाव स्तरावरील विविध विभागाचे कर्मचारी आहेत.या समितीत पुढील प्रमाणे सदस्य असतात


१) कृषी सहायक.
२) तलाठी
३) ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी
४) सचिव वि.का.से.स .सो.

या समितीच्या खालील प्रमाणे जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

१) योजनेची प्रसिद्धी व प्रसार करणे.
२) गाव पातळीवर शेतकऱ्याना येणाऱ्या अडचणी सोडवणे.
३) केंद्र व राज्य सरकारने बाबी लाभार्थाकडून पूर्ण करून घेणे

namo shetkari yojna 2023 | अखेर योजनेला मंजुरी मिळाली GR आला,आता वर्षाला १२,००० रू. मिळणार

आताच्या घडीची हि सर्वात मोठी घोषणा आहे. namo shetkari yojna 2023 लागू होणार आहे असे आपण सांगितले होते.हि योजना लागू झाल्यास शेतकऱ्याना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार ,अशी जोरदार चर्चा चालली होती.आता मात्र या योजनेला मंजुरी मिळाली आहे.

मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानच्या वार्षिक 6 हजार रुपयांच्या मानधनांसोबत आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी म्हणजेच cm kisan yojna ला मंजुरी मिळाली आहे.या योजनेअंतर्गत आता वार्षिक 6 हजार रुपये असे एकूण 12000 रुपये मानधन मिळणार आहेत.कारण या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय ( GR ) आज 15 जून 2023 रोजी काढण्यात आलेला आहे

namo shetkari yojna 2023

चला तर शेतकरी मित्रानो,या शासन निर्णयाच्या माध्यमातून हि शेतकरी योजना कशाप्रकारे राबवली जाणार ?योजने अंतर्गत कोणते लाभार्थी पात्र होणार ?अर्ज कसा व कुठे करायचा ? पहिल्या हप्त्याचे वितरण कधी केले जाणार? या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याघेणार आहोत.

मित्रांनो ३० मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळीय बैठकीत 2023 च्या बजेटमध्ये केलेली एक महत्त्वाचे अशी घोषणा केली होती.ती म्हणजे शेतकऱ्यासाठी नमो शेतकरी योजना शेतकऱ्यासाठी लागू केली जाणार. 30 मे 2023 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आलेली होती मात्र त्या बाबतचा ठोस शासन निर्णय अजून पर्यंत आला नव्हता.आता मात्र हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

cm kisan yojna २०२३ काय आहे? | namo shetkari yojna 2023 चे स्वरूप

२०१९ मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी pm kisan yojna हि लागू करण्यात अली होती .या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याना वार्षिक ६ हजार मिळत होते.हे ६ हजार एकूण चार चार महिन्याच्या अंतराने तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर येत होते.आणि मागील काही वर्षांमध्ये अतिवृष्टी मुले शेतकरी हतबल झाला असल्याने त्यांना हक्काचं वाढीव उत्पन्न उपलब्ध करून देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागू करण्यात अली आहे.

या देखील योजनेतून आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये देणार येणार असून तीन तीन महिन्याच्या अंतराने २ +२+२ असे ६ हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत.एकूणच काय तर कमी किसान योजना लागू झाल्यावर शेतकर्याना थेट 12 हजार मिळणार आहेत.या योजनेची अंमलबजावणी आता आज रोजी प्रसारित झालेल्या शासन निर्णया नुसार केली जाणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी पात्रता काय?

namo shetkari yojna 2023:-या योजनेचा लाभ जर शेतकरी मित्राना मिळवायचा असेल तर काही निकस हे राज्य सरकारच्या माध्यमातून ठरविण्यात आलेले आहेत या निकषांची पूर्ती करणारा प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना या योजनेसाठी प्रमाण म्हणून वापरण्यात येणार आहेत.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना 2020 मध्ये निर्गमित करण्यात आलेलया आहेत.या योजनेच्या मार्गदर्शक सूचनाच्या अधीन राहून राज्यांमध्ये ही cm किसान योजना राबवली जाणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अटी/निकष व पात्रता खालील प्रमाणे आहेत.

हे वाचा :- 14 व्या हप्त्यासाठी करा हे 3 काम नाहीतर मिळणार नाहीत २००० रुपये .


१) पाम किसान योजनेत पात्र असणारा प्रत्येक पात्र लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र राहील .
२) पाम किसान योजनेसाठी नवीन अर्ज केलेला मात्र पाम किसान योजनेसाठी पात्र असणारा लाभार्थी देखील पात्र राहील.

नमो शेतकरी योजना कशी राबविली जाणार त्याची कार्यपद्धती कशी राहणार ?


शेतकरी मित्रानो,पाम किसान योजने प्रमाणेच या योजनेची कार्यप्रणाली असणार आहे.ज्या पद्धतीने चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना २ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळते त्याच पद्धतीने या देखील योजनेची प्रक्रिया राहणार आहे.वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.cm किसान योजनेचा निधी हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठविली जाणार आहे.

नमो शेतकरी योजना अर्ज कुठे करावा ?

namo shetkari yojna 2023 : -या योजनेसाठी स्वतंत्र असा अर्ज करण्याची गरज नाही ,कारण ज्या शेतकऱ्याना pm किसान योजनेचा लाभ मिळतो त्या सर्वांना या योजनेत पात्र केलं जाणार आहे. राज्याच्या नमो शेतकरी योजनेसाठी रखुम ठेवलेल्या निधीतून लाभ देण्यात येणार आहे.सध्या या योजनेच्या कार्यप्रणालीसाठी कोणतेही पोर्टल उपलब्ध नाही.

मात्र लवकरच त्यासाठी पोर्टल तयार करण्यात यावे अशी सूचना देण्यात अली आहे.pm किसान योजना व cm किसान योजना यांचे पोर्टलचे एकत्रीकरण करण्यात यावे व एकाच वेळी त्यांना हे अनुदान मिळण्यास मदत होईल तसेच दोन्ही लाभार्थ्याच्या संख्येत होणारा बदल लक्षात येईल व त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

योजनेच्या निधी वितरणाची कार्यपद्धत कशी असणार?


“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या योजने अंतगधत कें द्र शासनाच्या PM-KISAN
योजनेनुसार खालील खालील वेळापत्रकानुसार लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट रकम पाठविण्यात येणार.खालील प्रमाणे खात्यात येणार पैसे.

अ.कहप्ता कालािधी (महिना )रक्कम
1पहिला हप्ता एप्रिल ते जुलै2000 रुपये
2दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर2000 रुपये
3 तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च2000 रुपये

नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी अपात्र होणार


जर तुम्ही pm किसान योजनेत अपात्र असाल तर या योजनेसाठी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता.
या काही गोष्टीमुळे शेतकरी अपात्र होऊ शकतात.

नमो शेतकरी योजनेला मिळाली मंजुरी पहा सविस्तर माहितीचा GR | GR पाहण्यासाठी इथे क्लिक करा


१) जर शेतकऱ्यानी pm किसान सन्मान निधी योजनेची ekyc केली नाही तर तुम्ही अपात्र होऊ शकता.
२) तुम्ही तुमच्या बँक खात्याची kyc म्हणजेच आधार प्रमाणीकरण न केल्यास तुम्ही अपात्र होऊ शकता.
३) तुमचे धार कार्ड अपडेट न केल्यास तुम्ही अपात्र होऊ शकता.
४) तुमचे बँक खाते बंद पडल्यास तुमच्या खात्यात हि रक्कम येणार नाही या कारणाने देखील तुम्ही अपात्र होऊ शकता.
५) तुम्ही लँड शेडींग न केल्यास अपात्र होऊ शकता.

PM KISAN EKYC कशी करायची?

चला तर आता जाणून घेऊया नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी PM किसान खात्याची ekyc कशी करायची.ekyc करण्यासाठी तुम्ही जवळच्या csc केंद्राला भेट देऊ शकता.हे केंद्रचालक काही फी घेऊन तुमची ekyc करून देतील.हि प्रक्रिया करायला फक्त ५ मिनिटे लागतात.ekyc करायला जात असताना आपले आधार कार्ड व pm किसान पोर्टल सोबत जोडून असलेला मोबाईल सोबत घेऊन जावे,कारण या मोबाईल वर opt येतो.


pm किसान योजेची मोबाईल वर ५ मिनिटात ekyc करा -त्यासाठी इथे क्लिक करा .

बँकेची kyc कशी करावी / बँकेत आधार प्रमाणीकरण कसे करावे?


आता कोणत्याही योजनेची निधी /पैसा तुमच्या खात्यावर येण्यासाठी बँकेची kyc करणे खूपच गरजेचं झालं आहे.कारण आता कोणतेही पेमेंट आधार बेस झाले आहे.तुम्ही बँकेचे आधार प्रमाणीकरण केले नाही तर मात्र तुमच्या खात्यावर येत नाही हे लक्षात घ्यावे.


आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल आणि बँकेत तुम्हाला kyc अर्ज मिळतो तो अर्ज पूर्ण अचूक भरून बँकेत द्यायचा आहे.त्यासोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड जोडायचे आहे.आधार प्रमाणीकरण होण्यासाठी ४ ते ५ दिवसाचा कालावधी लागतो .

पी एम किसान खात्याची लँड शेडींग कशी करायची


लँड शेडींग हि अतिशय महत्वाची आहे यावरून ठरते कि तुम्ही शेतकरी आहेत कि नाही.हि प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे कारण बरेच बोगस शेतकरी/लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.
लँड शेडींग करण्यासाठी तुमचा ७/१२ व ८ अ हे घेऊन तुमाला तहसील कार्यालयात भेट द्यायची आहे .तिथे गेल्या नंतर समोरील सर्व प्रक्रिया ते कर्मचारी करून देतात .

तुमचे बँक खाते कसे सुरु करावे ?


खरं पाहाता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे बँक खाते सुरु असणे आहे.कारण जर तुमचे खातेच चालू नसतील तर मात्र तुमच्या खात्यावर पाठविले जाणारे कोणतेच पैसे येणार नाहीत व तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही.तेव्हा बँक खाते कसे सुरु करावे व त्यासाठी कोणाला भेटावे हे आता पाहूया.या साठी तुम्हाला थेट बँकेत जायचं आहे.तिथे गेल्यावर तेथील मॅनेजरला तुम्हाला भेटून तुमचे खाते बंद झाल्याचं सांगायचं आहे.

पुढे तुमचे बँक खाते का बंद पडले हे ते तुम्हाला सांगतील आणि बँक खाते सुरु करण्यासाठी तुमची मदत करतील.तुम्ही बऱ्याच दिवसा पासून बँकेत व्यवहार न केल्याने तुमचे बँक खाते बंद पडू शकते .अशा वेळी तुम्हाला तुमच्या खात्यात १०० रुपये भरणा करायचा आहे.तुमचे खाते आता activate म्हणजे चालू होईल.तुम्ही kyc केली नसेल तरी तुमचे खाते बंद पडू शकते अशावेळी तुम्ही kyc करून घ्या खाते आपोआप सुरु होईल .

हे आहेत चालू वर्षाचे नवीन भाव-fertilizer price list 2023 -जाणून घ्या नाहीतर तुमची फसवणूक होईल .

संपूर्ण कंपन्यांचे DAP ,१० २६ २६ ,२० २० ० १३ ,पोटॅश चे नवीन भाव जाहीर | fertilizer price list 2023

fertilizer price list 2023 :- शेती करायची म्हटलं कि शेतीला लागणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रासायनिक खात.आता पूर्वी प्रमाणे काहीच राहील नाही,पूर्वी जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर होत होता आता मात्र सर्व शेतकरी फक्त आणि फक्त रासायनिक खताचा शेतीसाठी वापर करत आहेत.त्यामुळे सध्या चालू असलेल्या fertilizer price list 2023 शेतकऱ्याला माहित असणे गरजेचं आहे.

fertilizer price list 2023

दरवर्षी खताच्या भावात वाढ होत राहते तर कधी भाव सुद्धा कमी होतात.त्यामुळे जर शेतकऱ्याला चालू असलेले fertilizer price list 2023 माहित नसतील तर कृषी चालक शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करतात व शेतकऱ्याकडून जास्त पैसे घेतात म्हणून आज आपण विविध कंपन्यांचे खताचे दर तुम्हाला सांगणार आहोत.ज्यामध्ये युरिया,DAP,१०:२६:२६, २० २० ० १३,त्याच बरोबर संपूर्ण खताचे चालू भाव सांगणार आहोत.

Fertilizer new rate 2023 | असे असणार आहेत २०२३ चे या कंपन्यांचे खताचे बाजार भाव / खताचे भाव.

युरिया खताचे २०२३ चे बाजार भाव | UREA Fertilizer new rate

चला तर आपण सुरुवातीला विविध कंपन्यांच्या युरियाच्या किमती काय आहेत हे जाणून घेऊया.खालील बऱ्याच कंपन्यांनी त्यांचे २०२३ चे संपूर्ण भाव जाहीर केले आहेत.खात खरेदी करत असताना वेगवेगळ्या कंपन्यांचे खात हे शेतकरी खरेदी करत असतात.

हे देखील वाचा-आता शेतकऱ्याना मिळणार सोयाबीनचे २८ क्विंटल एकरी उत्पन्न

या कंपन्यांचे खताचे भाव जर आपल्याला माहित झाले तर कमी किमतीत उपलब्ध असलेल्या कंपनीचा युरिया आपण खरेदी करून आपला पैसा बचत करू शकतो. खाटांचे भाव खालील प्रमाणे दिलेले आहेत.

अ. क्र. खताचे नाव कंपनीचे नाव वजनभाव
1spic ureaspic45 kg 266 रुपये
2JK Mangla UreaJK Mangla45 Kg266.5 रुपये
3Narmada Urea Narmada45 Kg266.50 रुपये
4 IFFCO Urea IFFCO45 Kg 266 रुपये
5IPL Nim coted Urea IPL45KG266 रुपये
6 RCF Ujwalaa ureaRCF Ujwalaa45KG266.50 रुपये
7Gromor ureaGromor45 kg266 रुपये
8 RFCL KISAN UREA RFCL KISAN45KG266 रुपये
9krubhako Urea krubhako45kg266 रुपये
10JK PPL UREA JK PPL45KG266.50 रुपये
11 IFFCO Nano UreaIFFCO500ml240 रुपये
12NAGARJUN UREANAGARJUN45KG266.50 रुपये

10 26 26 खताचे २०२३ चे भाव | 10 26 26 new fertilizer rate

आता जाणून घेऊया १० २६ २६ या खताचे भाव.वेगवेगळ्या कंपनीच्या भावात मोट्या प्रमाणावर तफावत दिसून येते.अशावेळी आपल्याला या खताचे भाव माहित असतील तर स्वस्त दरात उपलब्ध कमानीचे खत खरेदी करून आपण मोठ्या प्रमाणावर पैसे बचत करू शकतो.संपूर्ण वेगवेगळ्या कंपन्यांचे खताचे बाजार भाव
खाली दिले आहेत

अ. क्र. खताचे नाव कंपनीचे नाव वजनभाव
1IFFCO 10 26 26 IFFCO50Kg 1470 रुपये
2Gromor 10 26 26 Gromor50Kg1470
3KRUBHAKO 10 26 26KRUBHAKO 50KG1470
4GROMOR ULTRA 10 26 26 GROMOR50KG 1235
5KISAN 10 26 26KISAN 50KG1175
6 PPL 10 26 26 PPL 50KG 1250
7 JAY KISAN 10 26 26 50KG1285

२० २० ० १३ खताचे २०२३ चे भाव | २० २० ० १३ new fertilizer rate

आता आपण मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या विविध कंपनीच्या २० २० ० १३ या खताचे २०२३ मध्ये नेमके काय भाव आहेत हे जाणून घेणार आहोत.कारण या कंपन्यांचे खताचे भाव हे वेगवेगळे असतात.आणि हे आपल्याला माहिती असणे गरजेचे असतात.

नाहीतर ज्या वेळी आपण कृषी केंद्रावर हि खात खरेदी करायला जातो तेव्हा आपल्याकडून हे दुकानदार जास्त पैसे घेतात ,ते आपली फसवणूक करतात.आता तुमच्या लक्षात आलं असेल कि खाताचे भाव आपल्याला माहिती असणे गरजेचं का आहे.

अ. क्र.खताचे नावकंपनीचे नावखताचे वजनखताचे भाव
1spic 20 20 0 13spic50 kg 1275
2gromor 20 20 0 13gromor 50kg 1300
3 IFFCO 20 20 0 13 IFFCO 50Kg 1400
4 Mangla 20 20 0 13 Mangla50 kg1350
5 IPL 20 20 0 13- IPL50Kg 1470
6krubhako 20 20 0 13krubhako50Kg1450
7FACT 20 20 0 1350kg1400
8KISAN 20 20 0 13 50KG=1350KISAN50KG1350

DAP 18 46 00 खताचे २०२३ चे भाव | IFFCO DAP 50 kg price

DAP खता बाबत बोलायचं झाल्यास तुम्हाला माहीतच असेल कि,या खताचे भाव खूप महाग मिळते त्यामुळे DAP खताचे भाव सर्व शेतकऱ्याना माहिती असणे गरजेचे आहे .हे भाव शेतकऱ्याना माहिती असले कि स्वस्त खत पुरवठा करणाऱ्या कंपनीचे खत खरेदी करतील. आणि त्यांचा फायदा होईल तेव्हा जाणून घ्या या खताचे संपूर्ण भाव.

अ. क्र.खताचे नावकंपनीचे नावखताचे वजनखताचे भाव
1 IPL DAP 18 46 00 IPL50KG1350
2 KISAN DAP KISAN50 KG1350
3Gromor DAPGromor50 kg1370
4mangla DAPMangla50KG1350
5 IFFCO DAP IFFCO 50KG13350
6KRUBHCO DAP KRUBHCO50 KG1350
7 SAMRAT DAPSAMRAT 50KG1350
8 RCF DAP RCF 50 KG1200
9SPIC DAPSPIC50KG1350
10GROMOR ULTRA DAPGROMOR50KG1400

पोटॅश ( MOP ) खताचे २०२३ चे भाव | MOP new fertilizer rate

आता आपण एकूण ५ कंपन्यांचे पोटॅश २०२३ चे नवीन भाव काय आहेत पाहणार आहोत.ज्यामध्ये खाताचे नाव काय.खताचे भाव 2023.खताची कंपनी याबाबत सुद्धा माहिती देणार आहोत.खताच्या बॅगचे वजन किती किलोचे आहे हे देखील सांगणार आहोत .आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या कंपनीच्या खताचे भाव किती आहेत हि संपूर्ण माहिती खालील रकान्यात पाहायला मिळेल .

अ. क्र.खताचे नावकंपनीचे नावखताचे वजनखताचे भाव
1पोटॅश IPL MOPIPL50KG1700
2पोटॅश GROMOR MOP GROMOR50 KG 1700
3पोटॅश ZUARI MANGLA MOPZUARI MANGLA50KG 1700
4पोटॅश IFFCO MOPIFFCO50KG 1700
5 पोटॅश KRUBHAKO MOP KRUBHAKO50KG1700

UREA -युरिया काम काय ?युरियाचे फायदे काय.

चला आता थोडक्यात जाणून घेऊया कोणत्या खताचे काय फायदे असतात तसेच ते खात कधी वापरायचे.युरिया हे खात पिकासाठी अतिशय महत्वाचे असते.कारण या खतामध्ये नत्र हा घटक असतो आणि पिकाचा हिरवेपणा टिकवून ठेवण्यासाठी हे काम करत असते .युरियामुळे नवीन पानं तयात होतात.

पिकात आलेला पिवळेपणा दूर होतो.सर्वात महत्वाचे म्हणजे पिकाच्या वाढीसाठी नत्र खूप महत्वाचे असते .तुमचे पीक वाढत नसल्यास तुम्ही युरियाचा वापर करू शकता.मात्र अधिक प्रमाणात युरिया वापरयास झाड फक्त वाढत जातात म्हणून युरिया गोगय प्रमाणात वापरावा.

SSP सिंगल सुपर फॉस्फेट काय करते.त्याचे फायदे काय ?

सिंगल सुपर फॉस्फेट यामध्ये फॉस्फरस हा १४% असतो.सल्फर हा ११% तर कॅल्शियम २१ % असते.आणि हे घटक प्रत्येक पिकासाठी आवश्यक असतात. सिंगल सुपर फॉस्फेट चा वापर योग्य पद्धतीने केल्यास झाडाचे फुटवे वाढण्यास मदत होते. याने शेतकऱ्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ होते.

या खताच्या वापराचा दुसरा फायदा असा कि हे खात वापरल्यास झाडाचे खोड हे मजबूत होते.बियाणातील तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी हे खात मदत करतात.यामुळे जमिनीतील पाण्याला धरून ठेवण्याची ताकत असते.

पोटॅश चे कार्य काय? पोटॅश वापराचे फायदे जाणून घ्या.

पिकासाठी पोटॅशचे अनन्यसाधारण महत्व आहे .या मुळे मुळांची योग्य अशी वाढ होते व जमिनीची अन्नद्रव्य घेण्यास पिकाला मदत होते.पिकांच्या फळांची वाढ करण्यासाठी पोटॅश काम करत असते.याने पिकाच्या शेंगा टपोऱ्या होतात दाण्याचा आकार वाढतो सोबतच त्याला रंग खुलतो व त्याला चकाकी येते .झाडातील प्रोटीन वाढविण्याचं काम देखील पोटॅश करत असते.प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेला पोटॅश मदत करते.

आता शेतकऱ्याना मिळणार सोयाबीनचे २८ क्विंटल एकरी उत्पन्न | Soyabin lagvd padhat 2023 |  SOYABEAN FARMING FULL INFORMATION

नमस्कार शेतकरी मित्रानो तुमच्यासाठी हा लेख अतिशय महत्वाचा आहे कारण आता तुमच्या सोयाबीनचे उत्पन्न एकरी २८ क्विंटल होण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करणार अहो .तुम्हाला देखील हे पटणार नाही मात्र आपल्या महाराष्ट्रातील एका शेतकऱ्यानी हे रेकॉड तोड उत्पादन घेतलं आहे आणि आज त्या बदल सविस्तर माहिती पहाणार आहोत .

तो शेतकरी कोण आहे? शेतकरी कुठे राहतो? त्या शेतकऱ्यानी कोणत्या वाणाची निवड केली?लागवड पद्धत ( Soyabin lagvd padhat 2023 ) कोणती वापरली? खात व्यवस्थापन तसेच कीटकनियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक वापरले हि संपून माहिती.तेव्हा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.हे व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर तुमचे देखील उत्पन्न ४-५ क्विंटल वरून २८ क्विंटल मिळेल .

सांगलीच्या शेतकऱ्याचं रेकॉर्ड तोड उत्पादन ५ क्विंटलहून थेट २८ क्विंटल.Soyabin lagvd padhat 2023

जर मित्रानो सर्व सामान्य शेतकऱ्याला विचारलं कि तुम्हाला सोयाबीनचा एकरी उत्पन्न किती मिळालं तर त्या शेतकऱ्याचं उत्तर असेल, ५ क्विंटल.दुसरा शेतकरी म्हणेल १० आणि जास्तीत जास्त १५ क्विंटल, या पेक्षा अधिक उत्पन्न अजून पर्यंत कोणत्याच शेतकऱ्याला मिळालं नाही,

मात्र सांगली जिल्ह्याचे रहिवाशी असलेले प्रशांत भानुदास पाटील यांनी भारतातील रेकॉड तोड उत्पादन म्हणजे एकरी २८ क्विंटक एव्हढं घेतलं आहे.ते एक प्रगतिशील शेतकरी आहेत आणि विविध प्रयोग आपल्या शेतात कटात असताततेव्हा त्यांनी लागवडी पासून तर काढणी पर्यंत केलेलं व्यवस्थापन आपण बघूया.

पूर्वमशागत

प्रशांत पाटील यांनी इतर शेतकऱ्या प्रमाणेच जमिनीची पूर्वमशागत केली ज्यामध्ये त्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी केली त्यानंतर जनीं मोकळी होण्यासाठी ट्रॅक्टरने रोटर केले आणि त्यानंतर ३.५ फुटाचे बेड पडले.

जमीन

तसे तर कोणत्याही जमिनीत आपण सोयाबीन घेऊ शकतो मात्र भारी कळीची जमीन सोयाबीन पिकासाठी अधिक फायदेशीर ठरते .म्हणजेच काय तर या जमिनीत खूप जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते.सोयाबीन पीक योग्य पद्धतीने घेण्यासाठी जमिनीचा PH हा ७.५ ते ८ असावा.व शेंद्रीय कर्रब १ % असावा .

प्रशांत पाटील यांची जमीन काळी भारी जमीन असून पाण्याचा चीनला निचरा होणारी आहे.तुम्ही सोयाबीन लागवडीसाठी माध्यम जमिनीची देखील निवड करू शकता..मात्र या जमिनीत तुम्हाला शेंद्रीय खताचे व्यवस्थापन करावे लागेल.

हवामान आणि लागवड वेळ

Soyabin lagvd padhat 2023 : प्रत्येक पिकासाठी हवामान आणि लागवडीची वेळ हि फारच महत्वाची ठरते. कारण वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळे तापमान आवश्यक असते.आणि या वातावरणात या पिकाचे अधिक उत्पन्न मिळू शकते अन्यथा फारच कमी उत्पन्न मिळते.त्यानंतर म्हणत्वाचा दुसरा विषय कि लागवड हि वेळच्या वेळेत करणे गरजेचे असते कारण.

सोयाबीन लागवडीची वेळ पहिली तर १ जून ते १० जुलैच्या आत असावी कारण या वेळेत तापमान बियाणे उगवणीसाठी चांगले राहते . २५ ते ३० डिग्री सेल्शियस तापमान हे सोयाबीन पिकासाठी अतिशय आवश्यक आहे.या तापमानात चांगल्या प्रकारे उत्पादन होऊ शकते.

वेगवेगळ्या महिन्यात तापमान बदलत असते आणि आवश्यक तापमानात लागवड न झाल्यास बीज उगवण क्षमतेवर मोठा परिणाम होतो.आणि याचाच परिणाम थेट उत्पनावर होतो.प्रशांत पाटलाच्या मते ढगाळ वातावरण हे सोयाबीन पिकासाठी चांगले असते.मात्र पावसात खंड हा आवश्यक असतो सतत पाऊस असल्यास सोयाबीनचे उत्पन्न फार कमी होते.

सोयाबीनची शेती हि बऱ्याच राज्यात केली जात आणि सोयाबीन लागवडीस योग्य वातावरण असलेले वातावरण हे पुढील राज्यात अनुकूल आहे
१) महाराष्ट्र.
२) गुजरात
३) मध्यप्रदेश
४) कर्नाटक
५) तेलंगणा
६) आंध्रप्रदेश
वरील पैकी कोणत्याही राज्यात शेतकरी मित्र सोयाबीन लागवड करू शकतात .

सोयाबीनच्या कोणत्या वाणाची निवड करावी.

सध्या मार्केट मध्ये खूप जास्त वाण आहेत मात्र आपल्या जमिनीनुसार तसेच विभगा नुसार सोयाबीन वाणाची निवड करावी.या संबंधित आपला ऑलरेडी एक लेख आहे त्यात दिलेले आहे कि सर्वात जास्त उत्पन्न्न देणारे ५ सोयाबीनचे वाण कोणते ?
खालील लिंक क्लिक करून लेख वाचा..

हे देखील वाचा-2023 सोयाबीनची सर्वात जास्त उत्पन्न देणारे टॉप 5 सुधारित वाण

प्रशांत पाटील यांनी फुले अग्रणी तसेच फुले किमया वाणाची निवड केली होती मात्र आता त्यापेक्षाही अधिक उत्पन्न देणारे वाण आहेत .तुम्ही फुले दुर्वा हे वाण लागवडीसाठी वापरू शकता.एकरी १५ किलो बियाणे लावावे.हे वाण 100 ते 105 दिवससाचे आहे.या वाणापासून एकरी १५ ते २० क्विंटल उत्पन्न सहज घेऊ शतक .पाटील यांच्यासारखे व्यवस्थापन केल्यास २० क्विंटलच्या वर उत्पन्न घेता येईल.

फले अग्रणी सोयाबीन वाण

फले अग्रणी सोयाबीन वाणाचे खालील 2 महत्वाचे वैशिट्य आहेत.

अनुक्रमांकवाणाचे नावप्रसारित वर्षकालावधीवैशिट्यउत्पन्न (हेक्टरी)
1फले अग्रणी2013-2014१००-१०५ दिवस1)बक्टेररयल पुरळसाठी सहनशील. 2)महाराष्ट्र व मध्यभारतासाठी प्रसाररत.२२-२४ क्विंटल

फुले दुर्वा

फुले दुर्वा सोयाबीनचे खालील 2 महत्वाचे वैशिट्य आहेत.

अनुक्रमांकवाणाचे नावप्रसारित वर्षकालावधीवैशिट्यउत्पन्न (हेक्टरी)
1KDS- 992 (फुले दुर्वा) 2021100 ते 105 दिवस1)तांबेरा रोग,जिवाणूजन्य ठिपके रोगासाठी प्रतिकारक्षम
2) मोठ्या आकाराचे  दाणे
15 te 25क्विंटल

फुले किमया

तुम्हाला लवकर येणारे वाण पाहिजे असेल तर फुले किमया या वाणाची तुम्ही निवड करू शकता.हे वाण ९० दिवसात काढायला येते

फुले किमया सोयाबीनचे खालील 3 महत्वाचे या वाणाचे वैशिट्य आहेत.

अनुक्रमांकवाणाचे नावप्रसारित वर्षकालावधीवैशिट्यउत्पन्न (हेक्टरी)
1फुले किमया (के डी एस 753) ——95 ते 100 दिवस1)तांबेरा व मूळकूज रोगास कमी बळी पडतो. 
2) दोन ते तीन दाण्यांच्या शेंगा
3)तेलाचा उतारा 18.25 %
10 te 15 क्विंटल

जमिनीनुसार सोयाबीन बियाणांचे प्रमाण

शेतकरी मित्रानो, बरेच शेतकरी मित्र पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी करतात.आणि त्यांना एकरी ३० किलो बियाणे पेरणीसाठी लागतात.त्यापासून त्यांचे होणारे उत्पन्न फक्त ५-६ क्विंटल एव्हढे कमी होते कारण ते बियाणांचे प्रमाण अतिशय चुकीचे आहे,यात सोयाबीन दाटते त्यामुळे ती फक्त उभट वाढते परिणामी फुटवे कमी प्रमाणात लागतात व उत्पन्न फारसे होत नाही.

बियाणांचे योग्य प्रमाण


सोयाबीनच्या कोणत्याही वना पासून तुम्हाला जास्त उत्पन्न घायचे असेल तर तुम्हाला खालील प्रमाणे बियाणांचे प्रमाण घ्यावे.
१) पेरणीसाठी – २२ ते २५ किलो
२) लागवडीसाठी- १२ ते १५ किलो

सोयाबीन बीजउगवण क्षमता

सोयाबीन बीज उगवण क्षमता तपासणी करणे हि अतिशय महत्वाची बाब आहे .तुम्हाला तर माहीतच आहे कि,मार्केट मध्ये बोगस बियाणांचा सुळसुळाट आहे. तसेच आपण जर बाहेरून बियाणे विकत घेत असाल तर ते बियाणे कसे आहे हा सांगता येत नाही.आणि जर आपण या बियाणाची उगवण क्षमता न तपासता पेरणी किंवा लागवड केली तर बियाणे निघत नाही.

परिणामी दुबार पेरणी करावी लगे.शेतकऱ्याच मोठं नुकसान होते व मोठ्या प्रमाणावर पैसा वाया जातो सोबतच वेळ देखील निघून जाते. म्हणून प्रशांत पाटील सांगतात कि,पेरणी किंवा लागवड करण्या अगोदर बियाणी उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी.

बीज उगवण क्षमता कशी करावी?

बीज उगवण करण्याच्या अनेक पद्धती आहेत मात्र एक सोपी पद्धत जी पाटील यांनी सांगितली आहे ज्यामुळे लवकरात लवकर बीज उगवण क्षमता तुम्ही करू शकता.त्यासाठी तुम्हाला बारदाना म्हणजेच एका पोत्याची गरज लागेल आणि ते सुरुवातीला ओले करून घ्यावे जसे कि तुम्हाला खालील फोटोत दिसत आहे.आता तुम्ही विकत आणलेल्या किंवा घरच्या बियाणातील १०० दाणे घेऊन १०-१० च्या १० लाईन मध्ये पोत्यावर ठेवायच्या आणि पोट गुंडाळून बांधून घायचे आहे.हे पोटे तुम्हाला अंधार असलेल्या खोलीत/ठिकाणी ठेवायचे आहे.

आणि त्यावर पाणी टाकत राहायचे जेणे करून त्यात ओलावा कायम रहित.आणि ५ दिवसा नंतर हे पोटे सोडून बघायचे.आता बियाणाची पाहणी करायची व जे बी उगवले नाही ते बाजूला घेऊन मोजायचे आहे.हे बी जर ५ निघाले आणि ९५ बिया उगवल्या तर समजायचे कि या बियाणाची उगवण क्षमता ९५% आहे.

बियाणे उगवण क्षमता करताना एक गोस्ट लक्षात घ्यावी कि, बियाणाची उगवण क्षमता जर ७० ते ८० टक्के किंवा त्यावर असेल तर हे बियाणे पेरणी किंवा लागवडीसाठी चांगले आहे.७० % पेक्षा कमी उगवण असेल तर ते बियाणे शेतकऱ्यानी वापरू नये.

सोयाबीन बीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया करणे हे आताच्या काळात अतीशय महत्वाचे आहे.कारण बरेच शेतकरी बीज उगवण तपासणी करतात आणि बियाणाची पेरणी/लागवड करतात मात्र मग लक्षात येते कि बियाणे खूपच कमी उगवले.खार पहिले तर हे बियाणे चांगले असतात मात्र जमिनीत बियाणे पेनरी नंतर बियाणाला बुरशीचा प्रादुर्भाव होतो.

हेच नाही तर बियाणे चांगले उगवले मात्र काहीच दिवसात सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचा तसेच कीटकांचा प्रादुर्भाव होतो म्हणून बियाणाला बुरशीची तसेच कीटक नाशकाची व वेगवेगळ्या जिवाणूंची प्रकारीया करावी. चला आता जाणून घेऊया प्रशांत पाटील यांनी कोणती बीज प्रक्रिया केली.

आपल्याला आपल्या जमिनीसाठी लागणाऱ्या बियाणाच्या प्रमाणानुसार पुढील व्यवस्थापन करायचे आहे.जर आपल्याकडे १५ किलो बियाणे असेल तर त्यासाठी आपल्याला २५० ग्राम PSB ,२५० ग्राम रायझोबियम,३०० मिली पाणी १०० ग्राम गुळ तसेच बुरशीचा प्रभाव होऊ नाही म्हणून ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणास 10 ग्रॅम असे मिश्रण बनवून बियाणाला लावायचे आहे.गुळाचा फायदा असा कि हे चिकट असल्या कारणाने बियाणाला योग्य पद्धतीने लागते.सोबतच आपण वापरलेल्या जिवाणूंची संख्या वाढ

सोयाबीन लागवड पद्धत 2023 | Soyabin lagvd padhat 2023

बरेच शेतकरी मित्र पारंपरिक पद्धतीने पेरणी करतात आणि याच कारणाने त्यांचे उत्पन्न घटते असे म्हणायला काहीच हरकत नाही.कारण पारंपरिक शेती मध्ये बियाणे अधिक प्रमाणात वापरले जाते त्यामुळे पीक दाटते आणि ते फक्त उभट वाढते त्याचे फुटवे होत नाही.

सोयाबीनचे जास्त उत्पन्न घ्याचे असतील तर मात्र प्रशांत पाटील यांच्यासारखे लागवडीचे अंतर किंवा लागवडीची पद्धत तुम्हाला घ्यावी लागेल.प्रशांत पाटील हे सोयाबीन लागवडीसाठी बेड पद्धतीचा वापर करतात.त्यांनी अगोदर शेतात ३.५ फुटाचे बेड पडून घेतले आणि मग नंतर बेडच्या उतरत्या दोन्ही बाजूने एका ठिकाणी ३-३ बियाणे टोकन केले. टोकन करत असताना दोन तासातील अंतर १ फूट आणि दोन झाडातील अंतर ९ इंच आहे.

ज्यामुळे झाडात मोकळी जागा राहते आणि सोयाबीन फुटवे करते. बेड लागवड पद्धतीचा फायदा असा कि जास्त पाऊस झाला तर बेडच्या मधीं असलेल्या नालीतून पाणी निघून जाते.जरी जमिनीत पाणी साचून राहिले तर सोयाबीनच्या पिकावर फारसा परिणाम होत नाही किंवा मुळावर बुरशी येत नाही आणि पाऊस कमी झाला तर बेड मध्ये ओलावा टिकून राहते.

सोयाबीन खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापन हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे.आपण जर खत योग्य पद्धतीने दिले तर जास्त उत्पादन होते कारण ज्या प्रमाणे आपल्याला जेवण आवश्यक असते आणि आपण योग्य आहार घेतला तरच आपले शरीर सुधृढ राहते व आपण जास्त काम करू शातो त्याच प्रमाणे पिकाचे देखील आहे.

पिकाला देखील रोगमुक्त राहण्यासाठी योग्य खताची आवशकता असते.
आपण सर्व शेतकरी पेरणी करताना खत देत असतो मात्र प्रशांत पाटील यांचं मात्र थोडं वेगळं गणित आहे.ते पूर्व मशागत करताना खताचे व्यवस्थापन करतात.हे पाहून तुम्हाला त्यांची पद्धत चुकीची वाटेल मात्र कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल.

प्रशांत पाटील यांनी पहिले नांगरणी केली आणि मग रोटर केले आणि त्या नंतर खताचे व्यवस्थापन केले.रोटर केल्या नंतर सिंगल सुपर फॉस्पेट ( SSP) एकरी ३ बॅग म्हणजे १५० किलो अधिक निंबोळी पेंड एक बॅग ५० kg,हि पेंड वापरल्यास मुळ्यांना कीड लागत नाही.

सोबत १० किलो सल्फर अधिक ३० किलो पोटॅश असे एकूण मिश्रण बनवून ट्रॅक्टरने बेड पाडण्याचे अगोदर जमिनीवर फेकून द्यायचे आणि नंतर बेड पडून घ्यायचे म्हणजे टाकलेले खत बेडमध्ये चांगल्या प्रकारे बुजून जाईल.आणि जर तुमच्या जमिनीचा PH कमी असेल तर मात्र तुम्हाला जमिनीला भुसभुशीत करण्यासाठी जीप्सम टाकावे लागेल.

सोयाबीन तणनाशक व्यवस्थापन

आपण सोयाबीन उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व गोष्टी करतो मात्र तणनियंत्रण हे न केल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर म्हणजे ७० % उत्पन्न घटते .त्यामुळे तणनियंत्रण हि बाब महत्वाची आहे.तणनियंत्रण दोन प्रकारे आपण करू शकतो एक मजूर लावून निंदण करून किंवा मग रासायनिक तणनाशकाचा वापर करून.वेळेवर मजूर मिळत नाहीत त्यामुळे रासायनिक तणनाशकाचा वापर करून तणनियंत्रण सोपं आहे.

प्रशांत पाटील यांनी पेरणी नंतर लगेच फवारणी करण्याचे तणनाशक फवारणी केली.हे तणनाशक फवारणी केल्यास ४० दिवसा पर्यंत कोणतेच तण उगवत नाही.मार्केट मध्ये अनेक तणनाशक मिळतात त्यापैकी तुम्ही कोणतेही एक तणनाशक वापरू शकता मात्र Oxyflourfen हा घटक चांगला आहे.याची फवारणी पेरणीनंतर २४ तासाच्या आता करायची आहे.प्रति एक लिटर पाण्यासाठी १ मिली असे प्रमाण घ्यायची आहे.फवारणी करताना जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे.तरच हे चांगल्या प्रकारे तणनियंत्रण करू शकते.

सोयाबीन कीटकनाशक नियंत्रण

कोणत्याही पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पन्न घायचे झाल्यास त्या पिकावरील कीड/कीटक नियंत्रण करणे आवश्यक असते नाहीतर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास ७० ते १००% नुकसान होण्याची शक्यता असते.पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो म्हणून योग्य वेळी योग्य त्या कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.

फवारण्याचे व्यवस्थापन करत असताना आपले पीक किती दिवसाचे आहेत हे लक्षात घ्यावं व त्यानुसार दिवसाचे अंतर घ्यावे.सोयाबीन लवकर येणारे असल्यास फवारण्या लवकर लवकर घ्याव्या.किंवा मग उशिरा येणारे सोयाबीन असल्यास जास्त काळ प्रभाव करणारे कीटक नाशक वापरावे.

टीप :- हे फवारणीचे व्यवस्थापन फुले अग्रणी या वाणासाठी प्रशांत पाटील यांनी केलेले आहे .तेव्हा आपण निवड करत असलेलं वाण किती दिवसाचं आहे? त्यावर कोणते रोग येतात? या गोष्टीचा विचार करून फवारण्यात व्यवस्थापन करावे.

सोयाबीन पहिली फवारणी

पहिली फवारणी हि पीक लागवडीपासून १० व्या दिवशी करावी .या फवारणीमध्ये क्लोरोपायरीफॉस १ मिली प्रति १ लिटर पाण्यासाठी घ्यावे.तुम्ही हे कोणत्याही कंपनीचे क्लोरोपायरीफॉस घेऊ शकता.शेंद्रीय शेती करत असाल तर निंबोळी अर्कांची फवारणी करता येईल.

सोयाबीन दुसरी फवारणी

दुसरी फवारणी हि अतिशय महत्वाची ठरते, कारण आता पीक मोठे झालेले असते आणि त्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालेला असतो.आणि त्यावर योग्य फवारणी घ्यावी.हि फवारणी लागवडीपासून २५ दिवसाणी घ्यावी.ज्यामध्ये १९ : १९ : १९ हे विद्राव्य खात ४ ग्रॅम प्रति १ लिटर पाण्यासाठी अधिक सूक्ष्मअन्नद्रव्य ( micronitron ) ३ ग्रॅम पती १ लिटर पाण्यासाठी.

सोयाबीन तिसरी फवारणी

तिसरी फवारणी हि लागवडीपासून ४५ दिवसांनी घ्यावी.आता तुमचे पीक फुलावस्थेमध्ये असते.५% फुल दिसत असताना हि फवारणी तुम्हाला घायची आहे.त्यामुळे या वेळी देखील एक फवारणी तुम्हाला घायची आहे.या फवारणीत क्लोरोपायरीफॉस ५०% २ मिली प्रति १ लिटर पाण्यासाठी अधिक १२ : ६१ : ०० हे ४ ग्रॅम प्रति १ लिटर पाण्यासाठी असे प्रमाण घेऊन फवारणी करावी.

सोयाबीन चौथी फवारणी

चौथी फवारणी हि लागवडीपासून 7० दिवसांनी घ्यावी.आता तुमचे पीक शेंगा आवस्थेमध्ये असते.हि फवारणी शेंगा भरण्यासाठी महत्वाची ठरते.फवारणीत m45 बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति १ लिटर पाण्यासाठी अधिक 00 : 52 : 34 हे 5 ग्रॅम प्रति १ लिटर पाण्यासाठी असे प्रमाण घेऊन फवारणी करावी.

सोयाबीन पाचवी फवारणी

हि शेवटची फवारणी असून हि फवारणी फारच महत्वाची आहे. कारण हि फवारणी तुमच्या दाण्याचा आकार व सोयाबीनचा चकाकी वाढवते तसेच शेंगा लवकर भरायला मदत करते.या फवारणीत ०० ०० 50 हे विद्राव्य खात 7 ग्रॅम अधिक m45 हे बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी.

शेतकरी मित्रानो सोयाबीनच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी खालील काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या

१) पेरणीसाठी फक्त २0 ते २२ किलो बियाणे वापरावे.
२) लागवडीसाठी- १२ ते १५ किलो बियाणे वापरावे
3)तांबेरा रोग,जिवाणूजन्य ठिपके रोगासाठी प्रतिकारक्षम वाण निवडावे
4) सुपिक व मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन पेरणीसाठी निवडावी.
5) नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा..
४) पेरणी योग्य वेळी करावी.
६) पेरणीच्या अगोदर बियाणे उगवणशक्ति तपासून पाहावी.
७) शक्यतो शेतक-यांनी घरचे बियाणे वापरावे.
८) बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करूनच बियाणे पेरावे .
९) बियाणे जास्त खोलवर पेरू किंवा लावू नये.
१०) उताराला आडवी तसेच पूर्व- पश्चिमी पेरणी करावी.
११) पीक फुलो-यावर असताना कोणत्याच कीटकनाशकाची फवारणी करू नये.त्याने फुलगळ होण्याची शक्यता असते.
१२) चिभडं जमीन असेल तर बेडवर लागवड करावी.
१3) योग्य वेळी फवारणी व तणनियंत्रण करावे.

fertilizer new rate 2023 | खताचे 2023 नवीन भाव -खताचे भाव झाले कमी,पहा सविस्तर माहिती.

fertilizer new rate 2023 :- आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी,यंदाची खरीप पेरणी हि खूप कमी खर्चात होणार आहे कारण आता खताच्या ( khatache bhav 2023) दारात मोठ्या प्रमाणावर घाट झाली आहे.चला तर शेतकरी मित्रानो पाहुयात कोणत्या खताचे भाव कमी झाले? कोणत्या खताचे भाव कायम आहेत? तसेच कोणत्या खताचे भाव कमी झाले नाही?

आजच्या बातमीपत्रामध्ये चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती तेव्हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि लेख आवडल्यास लीके करायला विसरू नका तसेच whatsapp च्या माध्यमातून जास्तीत जास्त share करा.

fertilizer new rate 2023

हे पण वाचा-आताची मोठी बातमी-या पिकाच्या हमी भावात वाढ –पहा नवीन भाव

शेती करायची म्हटलं कि खत हि अतिशय महत्वाची बाब आहे आणि त्याशिवाय शेती करणे हे अशक्य आहे.आणि याच कारणाने शेतकऱ्याना खताचे दर ( fertilizer new rate 2023) काय आहेत हे समजून घेणे गरजेचं आहे अन्यथा शेतकर्याची फसवणूक होऊन त्यांच्याकडून अधिक पैसे उकळले जातात.

केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकरी सुखावला -fertilizer new rate 2023७ खताचे दर घटले.

२०२३ खताचे भाव:- प्रत्येक वर्षाला खत कंपन्या खातांच्या किमतीत वाढ करताना दिसत आहेत.मात्र या वर्षाला खताच्या दारात वाढ न होता घाट झाल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी आनंदी होणार आहे.कारण एकूण ७ खताच्या दारात मोठी घट झाली आहे. मागील वर्षी या खताचे नेमके दर काय होते या वर्षाला खातांचे दर काय राहणार?कोणती कंपनी आहे कोणतं खत आहे? हे एकूणच खालील रकान्यात दाखविले आहे.

अनुक्रमांक खताचे नाव २०२२ चे भाव २०२३ चे भाव वाढविवरण ( वाढ/घट )
113 35 14 15501400150 घट
2DAP-18 48 0013501200150 घट
3NPS-20 20 00 1312501050250 घट
4NPS- 16 20 00 13 11501000150 घट
5NPK-10 26 26 14701300170 घट
6NPS-28 28 0 01500145050 घट
7NPKS-15 15 15 914701150320 घट

खत भावशीर न मिळाल्यास शेतकऱ्यानी कुठं तक्रार करावी ?

शेतकरी मित्रानो ,तुम्ही जेव्हा खत,बी-बियाणे खरेदी करायला जाता तेव्हा मात्र तुमची बऱ्याच वेळ फसवणूक केली जाते.तुमच्याकडून जादा पैसे घेतले जातात अशावेळी नेमकं काय करावं ? तक्रार कशी करावी?तक्रार कुठे करावी? हे माहित नसते.शेतकरी मित्रानो जर तुमच्या सोबत अशा काही प्रकार घडला तर तुम्हाला त्यासाठी कृषी विभागात लेखी स्वरूपाची तक्रर करावी लागते.

तक्रार करत असताना तुम्ही विकत घेतलेल्या मालाचे वर्णन त्यात आपल्याला करायचे आहेत.कोणत्या कृषी केंद्रातून हि खात/बी-बियाणे विकत घेतली हे देखील तक्रारीत स्पस्ट लिहायचे आहे .संपूर्ण तक्रार लिहिणं झाली कि,तालुका कृषी विभागात तालुका कृषी अधिकाऱ्याला हि तक्रार द्यायची आहे.आणि अतिशय महत्वाची बाब म्हणजे त्या सोबत आपण माल खरेदी करताना घेतलेले बिल जोडायचे.

तक्रार करताना हे काम कारा नाहीतर मिळणार नाही मदत .

बऱ्याचं शेतकऱ्यानी अशा तक्रारी केल्या मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही.असे नेमकं का होते,हि मदत का मिळत नाही हे समजून घेऊ.सर्वात महत्वाचं शेतकऱ्याना नेमकी तक्रार कशी करावी हेच माहित नसते.आणि दुसरा मुद्दा असा कि बरेच शेतकरी खत किंवा बियाणे विकत घेताना पक्के बिल घेत नाहीत .दुकानदार देखील शेतकऱ्याना कचे बिल देतात आणि हे कचे बिल जर तक्रर करताना जोडले तर तुमाला कोणतीच मदत मिळत नाही. तेव्हा तक्रार करत असताना शेतकऱ्यानी नेहमी पक्के बिक जोडावे.

कापसाचे वाण निवडतांना ह्या 6 गोष्टी लक्षात घ्या | kapus | kabaddi cotton seeds